पारनेर प्रतिनिधी : अरुण बेलकर
पारनेर : पारनेर तालुक्यातील दुष्काळी गावांना दुष्काळी गावांना पाणी मिळाले पाहिजे यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेने पाणी संघर्ष लढा उभा केला आहे. पारनेर तालुक्याचे हक्काचे दोन टीएमसी पाणी तालुक्यातील दुष्काळी भागांना लवकरात लवकर मिळाले पाहिजे.
तालुक्यातील उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करून शेतकऱ्यांना बंद पाईप लाईनद्वारे पाणी मिळाले पाहिजे. तालुक्यातील साठवण तलावांमध्ये पाणी सोडून तालुक्यातील तहान भागवली जावी. तालुक्यातील प्रत्येक गावाला प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे स्वच्छ व शुद्ध पाणी मिळाले पाहिजे. तालुका टँकर मुक्त झाला पाहिजे.
प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या हक्काचं पाणी शेतीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी यासाठी तालुक्यातील युवकांनी पुढाकार घेऊन पाण्यासाठी चालू असलेल्या लढ्यात मोठ्या संख्येनेसहभागी होऊन लढा बळकट करण्याचे आवाहन भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर यांनी लोणी हवेली येथे झालेल्या कार्यक्रमात केले. यावेळी कार्यक्रमासाठी
अशोक आंधळे, बाळशिराम पायमोडे, संतोष वाबळे, अन्सार पटेल, अनिल सोबले, गोरख पठारे, राहुल गुंड, मंजाबापू वाडेकर, सरपंच बाजीराव दुधाडे, सचिन दुधाडे, बाळकृष्ण दुधाडे, संजय कोल्हे, बाळकृष्ण कोल्हे, युवराज कोल्हे, देवराम कोल्हे, रामदास कोल्हे, राजू कोल्हे, अंकुश सोंडकर, सोपान सोंडकर, अनिल कोल्हे, दगडू कोल्हे, अंकुश कोल्हे, भीमाजी कोल्हे, जिजाबापू कोल्हे, एकनाथ कोल्हे, दत्तात्रय दुधाडे, प्रभाकर कोल्हे,
भास्कर कोल्हे, दगडू कोल्हे, अर्जुन तडके, श्रीरंग साठे, भानुदास कोल्हे, दत्तात्रय दुधाडे, राजेंद्र दुधाडे, अण्णासाहेब कोल्हे, विलास कोल्हे, दत्तात्रय कोल्हे, दत्तात्रय बोरुडे, राजाराम कोल्हे, बाबासाहेब बोरुडे, दौलत कोल्हे, मच्छिंद्र कोल्हे, चांगदेव कोल्हे, अशोक कोल्हे, इंद्रावन सोंडकर, गोरख साठे, सिताराम दुधाडे, दशरथ देशमाने, प्रकाश कोल्हे, बाबुराव साठे, जिजाबापू दुधाडे, सुभाष दुधाडे, दत्तात्रय कोल्हे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







No comments:
Post a Comment