शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Saturday, February 8, 2025

शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश


 मुंबई : राज्यातील सर्वच शिव पाणंद आणि शेतरस्त्यांची हद्द निश्चित करून त्यांची कामे दर्जेदाररीत्या पूर्ण करा, अशी सूचना प्रशासनाला देत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर महसूल प्रशासनामार्फत फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे आदेश दिले आहेत.

शिव पाणंद आणि शेत रस्ते समृद्ध करण्याबाबत नागरिकांच्या सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे, नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे या बैठकीस उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले, नागपूर जिल्ह्यात प्रती किलोमीटर केवळ आठ ते दहा लाख रुपये खर्चामध्ये उत्कृष्ट पाणंद रस्ते बनविण्यात आले आहेत. या कार्यपद्धतीचा सर्व जिल्ह्यांनी अभ्यास करून इतर जिल्ह्यांमध्येही याप्रमाणे कार्यवाही करावी. तसेच ग्रामस्तरीय शेतरस्ता समिती स्थापन करून त्याचा अहवाल शासनास सादर करावा. रस्त्यांचे काम दर्जेदार होईल, याची दक्षता घ्यावी. पाणंद रस्त्यांबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे एका महिन्यात निकाली काढावीत.

पाणंद रस्ते, शेतरस्ते, सार्वजनिक वहिवाटीच्या रस्त्यांच्या मोजणी आणि पोलिस संरक्षणासाठी असलेली फी रह करण्याचा विचार करण्यात येईल, असे ते म्हणाले.



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here