
मुंबई : फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीसच तापमानाने सरासरी ओलांडल्याने आता मार्च महिन्यातही मुंबईकरांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मार्च ते मे दरम्यान कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार असून, उष्णतेच्या लाटांची (Heatwave) संख्या आणि तीव्रता अधिक असण्याची शक्यता आहे.
देशभरात यंदाचा फेब्रुवारी महिना विक्रमी उष्ण ठरला. 1901 पासूनच्या हवामानाच्या नोंदी पाहता, 2025 चा फेब्रुवारी हा सर्वाधिक तापमान असलेला महिना ठरला आहे. याआधी जानेवारी महिनाही उष्णतेच्या दृष्टीने उच्चांक गाठणारा ठरला होता. जानेवारी 2025 मध्ये देशाचे सरासरी तापमान 18.98 अंश सेल्सिअस होते, जे 1901 नंतरचे तिसरे सर्वोच्च तापमान होते.
महत्त्वाच्या टिप्स:
- शक्यतो उन्हाळ्यात दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे.
- पुरेसे पाणी प्या आणि शरीराला हायड्रेट ठेवा.
- हलके, सुती कपडे वापरा आणि डोके व चेहरा झाकण्यासाठी स्कार्फ किंवा टोपीचा वापर करा.
- गरम व तळलेले पदार्थ कमी करून फळे आणि पाणीयुक्त आहार घ्या.







No comments:
Post a Comment